Marathi Motivational Story
तर मित्रांनो संबंध देश नाही तर वैष्णव आज कोरोना (CORONA) ह्या महाभयंकर महामारीने होरपळुन निघत आहे. भारत आणि इतर देशात सर्व तरुण वर्गाची आर्थिक बाजु कोलमडुन पडली असुन आज प्रत्येक तरुणास गरज आहे ती पुन्हा लढण्याची आणि नं हारता पुन्हा जिद्दीने कामाला लागण्याची त्या साठी आपण मोटिवेट (Motivate) होऊया आणि म्हणुन मी तुमच्या साठी घेऊन येत आहे नवनवीन मराठी मोटिव्हेशनल स्टोरी (Marathi Motivational Story).
तर मित्रांनो स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि ह्या लिंक ला आपल्या सर्व मित्र परिवारात फॉरवर्ड करा कदाचित तो मोटिवेट होऊन काही नवीन करण्याची संकल्पना आपल्या मित्रास मिळेल.
काही वर्ष पुर्वीची हि एक गोष्ट
आहे, एका गुरूंना आपला एक शिष्य खुपच आवडायचा त्याच्यावर गुरुजी खूप प्रेम करायचे कारण शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर-सन्मान करत असे. परंतु तो शिष्य अभ्यासात खूप आळशी होता.
तसा तो गुरुजींचा आवडता पण त्याच्या ह्या आळशी स्वभावामुळे शिष्यवर्गात त्याचीच गुरुजींना खूप चिंता वाटू लागली होती, त्यांना हि भीती होती कि जीवनाच्या संघर्ष्यात कदाचित हा हरणार तर नाही ना? आळस हा मनुष्य प्राण्यास कर्मशुन्य बनवते हे गुरुजी जाणून होते.
ज्या व्यक्ती मध्ये निर्णय घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची सवय नाही त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही. आणि मग अशी व्यक्ती नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतात (गाडी निघुन गेल्यावर हात करायचा), आता फार उशीर झाला माझे वय निघुन गेले, मला कुणाचे योग्य मार्गदर्शन नाही झाले, आमची घरची आर्थिक परिसथिती नाजुक होती, मला कोणी मित्र किंवा परिजनांनी, घरच्यानी मदत नाही केली नाहीतर मी आज खूप पुढे असतो, काही काही महाभाग तर असे पण आहेत कि जे आपल्या जन्मदात्या आई वडिलांना च दोष देतात कि साठी तुम्ही काही कमवून नाही ठेवले.
गुरूंनी आपल्या
शिष्याच्या कल्याणासाठी आणि त्याची मानसिकता बदलावी ह्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, आणि एक योजना आखली.
एके दिवशी गुरुजी आपल्या खोलीत त्या शिष्यास बोलावतात आणि त्याला एक सोन्याचे नाणे देतात.
गुरुजी म्हणाले - "मी तुला जादुई सोन्याचे नाणे दोन दिवसाठी देत आहे आणि मी कामानिमित्त बाहेर गावात जात आहे. हे सोन्याचे नाणे तु ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्या लोखंडी वस्तूचे सोन्यात रुपांतर होईल. पण लक्षात ठेव सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून पुन्हा घेईन."
आता शिष्य हि संधी मिळाल्या मुळे खूपच खुश झाला, आपल्याला एक जादूचे नाणे मुलाला आहे, आता आपण खूप काही करू शकतो आणि विकत घेऊ शकतो ह्याच आणि अश्या असख्य विचार तो करू लागला. त्याच्या जवळ भरपूर सोनं असेल, तो खूप धनवान असेल खुश आणि संतुष्ट असेल, नोकर चाकर असतील, त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठाव लागणार नाही.
रात्र भर विचार करण्यात घालवल्या मुळे दुसऱ्या दिवशी तो
सकाळी उशिरा उठला उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते कि सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस
आहे.
तो मनो मन विचार करू लागला कि गुरुजींनी दिलेल्या सोन्याच्या नाण्याचा आज पुरे पूर फायदा उठवायचा. म्हणून आज आपण दुपारी बाजारात जाऊ आणि भरपूर लोखंडी वस्तू घेऊ आणि त्या नंतर आपण त्याचे सोन्यात रूपांतर करून पैसे कामूया.
दिवस पुढे पुढे सरत होता, परंतु त्याच्या दैनंदिन आळशी स्वभावामुळे त्याला कधी दुपार झाली हे कळलेचं नाही. नेहमी प्रमाणे करू नंतर थोड्यावेळाने करता करता दुपार झाली, आता दुपारचे जेवन करू अजून भरपूर वेळ आहे, असा विचार केला. अजून आपल्या कडे अखा अर्धा दिवस आहे. तो अजून ह्याच विचारात होता कि अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो. परंतु जेवल्यानंतर त्याला आराम करण्याची सवय होती. त्याने बाजारात जाण्यापुर्वी थोडा आराम करण्याचा निर्णय केला.
आळशी असल्याने तो नेहमी प्रमाणे पूर्णपणे गाढ झोपी गेला, आणि जेंव्हा उठला
तेंव्हा कळले कि सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे.
मला कोणी का नाही उठवले माझे महत्वाचे काम होते असा टोला लगावून तो वेगाने बाजाराकडे पळू लागला परंतु रस्त्यातच
त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्याने त्यांचे पाय धरले आणि तो त्यांची विनवणी
करू लागला कि अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा.
गुरुजी त्याचं न ऐकता ते सोन्याचे नाणे घेऊन निघून गेले श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहील.
आता त्याला समजले कि आळस हा त्याच्या आयुष्याच्या प्रगती मधील सर्वात मोती अडचण आहे काठी आहे. तेव्हा त्याने प्रण घेतला कि तो आता पासून कोणतेही काम हे थोड्या वेळाने किंवा नंतर करणार अथवा उद्यावर ढकलणार नाही कोणत्याही कामापासून दूर पाळणार नाही.
आयुष्यात कष्ट आणि कष्ट च करून पुढे जावे लागणार आहे.
Moral of this Marathi Motivational Story.
मित्रांनो, मित्रानो खरंच विचार करा आपल्या आज परियन्त जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध झाल्या होत्या पण आपण त्या पैकी किती संधीचे सोने केले. मनुष्याने ह्या संधी
केवळ आळसा मुळे वाया घालवतात.
तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला आपल्या आणि आपल्या प्रिय जणांना आनंदी तसेच तुम्हाला यशस्वी, श्रीमंत व्हायचं
असेल तर आळस हा सोडावाच लागेल. आपल्यामध्ये विवेक, कर्म जागृती ह्यासारख्या गुणांना विकसित करायला हवे.
मित्रांनो, आज पासून जेव्हा तुम्हाला एखादे निर्णय किंवा काम करायचे असेल आणि तुम्ही ते उद्यावर किंवा नंतर करू असे म्हणत असाल तर आपल्या मनाला एक प्रश्न नकीच विचार - "आज का नाही?"
आपण सर्वांचे मनःपुर्वक आभार!
Read more Marathi Motivational Story
अशाच नवनवीन Marathi Motivational Story वाचायच्या असतील तसेच तुम्ही चांगले वाचक असाल तर आमच्या blog ला subscribe करा आणि जेणे करून आमची नवीन Marathi Motivational Story ब्लॉग चे ई-मेल द्वारे notification मिळेल.
Comment द्वारे आपले मनोगत नकीच share करा.
धन्यवाद .....!