शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कि दर्भा शिवाय धर्म अनुष्ठान व उदक स्पर्शा शिवाय दान तसेच जप माळे शिवाय न मोजता केलेला जप हि सर्व निष्फळ आहे. जप माळे वर जप केल्यास पुढील फायदे होतात १) माळे मुळे जप किती झाला ते बरोबर कळते. २) जप माळ हि रुद्राक्ष, तुळस या सारख्या पवित्र नॆसर्गिक आयुर्वेदिक झाडापासून म्हणजेच वस्तूने बनवलेली असल्याने त्या पवित्र वस्तूंचे सानिध्य आपणास सहज पणे लाभते. ३) जप माळ करताना मनुष्याचे अंगठा व बोटे यांच्या घर्षणाने जी एक विलक्षन विध्युत शक्ती निर्माण होते, ती शरीरातील नसा द्वारे हृदय प्रभारित करते व मनाची एकाग्रता वाढवते.
No comments:
Post a Comment